इराणमधून तातडीने बाहेर पडा! भारतीय पर्यटकांना दूतावासाचा तात्काळ इशारा

आदित्य कदम
1 Min Read

इराणमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तेथील भारतीय दूतावासाने आता भारतीय पर्यटकांसाठी मोठी सूचना जारी केली आहे. तेहरानमधील दूतावासाने सूचित केले आहे की, वाढत्या सुरक्षा धोक्यामुळे भारतीय नागरिकांनी शक्य तितक्या लवकर इराण सोडावे. दूतावासाच्या या आपत्कालीन सूचनेमुळे अनेक भारतीयांमध्ये चिंतेची लाग लागली आहे.

अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या भारतीय नागरिक आत्ता इराणमध्ये आहेत, त्यांना तात्काळ सतर्क व्हण्याचा आवाहन केले आहे. दूतावासाने स्पष्टपणे सांगितले आहे की, पर्यटकांनी व्यावसायिक उड्डाणांसह उपलब्ध वाहतुकीच्या पद्धतींचा वापर करून देश सोडणे उचित ठरेल.

सध्या इराणमध्ये भारतीय दूतावासाने एक आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे. तसेच, कॉन्सुलर मदतीसाठी अनेक संपर्क क्रमांक आणि अधिकृत ईमेल आयडी जाहीर केले आहेत. जर तुम्ही तिथे असाल तर तात्काळ त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

दूतावासाच्या या सूचनेमध्ये असेही म्हटले आहे की, सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. निदर्शने सुरू असलेली ठिकाणे टाळावीत आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे. तसेच, आपले प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे (पासपोर्ट आणि ओळखपत्रे) सहज उपलब्ध असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

ज्या भारतीयांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही, त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर लगेच नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *