महाराष्ट्रातील राजकीय खेळात बंडखोरीचा ‘यशवंत सेना’ पॅटर्न, जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र

आदित्य कदम
11 Min Read

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस उत्तेजक बनत आहे. सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे, तर धाराशिव जिल्ह्यात ‘यशवंत सेना’ पॅटर्न रंग लागत आहे. या निवडणुकीत बंडखोरीची पातळी वाढल्याचे दिसत आहे, आणि पक्ष व नेत्यांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल घडत आहेत.

सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात ही निवडणुका लढली जाणार आहे. एकीकडे संजय राऊंतांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापि जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आला आहे.

धाराशिव जिल्ह्यात बंडखोरीचा ‘यशवंत सेना’ पॅटर्न दिसून येत आहे. शिवसैनिक व इतर पक्षातील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी ‘यशवंत सेनेचा’ मार्ग निवडला आहे. धाराशिव, तुळजापूर व कळंब या तालुक्यात अनेक इच्छुकांनी हा मार्ग स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यशवंत सेने तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर शिवसेना समावेश असून भाजपच्या बंडखोरांनी देखील यशवंत सेनेचा पर्याय निवडला आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेत फूट पडल्याने महायुतीची घोषणा झालेली नाही तर महाविकास आघाडीमध्येही सगळं काही अलबेल नसल्याने बंडखोरीला मोठे ग्रहण आले आहे. याला कितीपत यश मिळते याकडे लक्ष लागले आहे.

रत्नागिरीत शिंदे सेनेत बंडखोरी झाली आहे. रत्नागिरीतल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील का ठेवलं हा आपल्यापुढे प्रश्न असून, फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही. त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. असं असलं तरी जनमताचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं परशुराम कदम यांनी स्पष्ट केलं आहे. २१ तारखेपासून मला अनेकांचे फोन आले, मी केलेल्या कार्याला अनेक जण पाठींबा देत असल्याचं देखील कदम यांनी म्हटलं आहे.

रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी अंती जिल्हा परिषदेसाठी ३६१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समितीसाठी ६५६ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी चालू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६०५ मतदान केंद्र तर १४ हजारांहून अधिक मतदान यंत्रे असणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नगरपरिषदा व महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या चुका जिल्हा प्रशासन टाळणार आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये वारंवार ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या आल्या होत्या तक्रारी. ईव्हीएम मशिन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. ह्याच चुका जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशासन टाळणार असून ईव्हीएम मशिन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी नूतन नगरसेवकांची पहिली विशेष सभा होण्याची शक्यता असून, महिनाअखेरपर्यंत शहराला नवे महापौर मिळणार आहेत. महापालिकेने सभेसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, आज किंवा रविवारी तारीख व वेळ निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, २७ ते २८ जानेवारी दरम्यान महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारीला निवडीची सभा पार पडणार असून, ३१ जानेवारीला सभा होण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. पदवाटप आणि आघाडी नोंदणीसाठी भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आजपासून बैठका सुरू झल्या असून, शनिवार-रविवारी अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, इचलकरंजी महापालिकेसाठीही याच धर्तीवर कार्यक्रम निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत.

वर्ध्यात ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार पालकमंत्री पंकज भोयर यांचे शेतकऱ्यांना बाजारपेठकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑरगॅनिक शेती करत असून बाजारपेठ उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन उमेदच्यावतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची चिमुकल्यांना मिळणारा सकस आहार नित्कृष्ट मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हिंगोली तालुक्यातील भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे गाव असलेल्या आडगाव मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात वेळोवेळी सूचना देऊन देखील कार्यवाही होत नसल्याने या गावचे सरपंच ज्ञानबा मुटकुळे यांनी हा निकृष्ट दर्जाचा आहार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आणला होता. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा सगळा प्रकार सुरू असून संबंधित अधिकारी आणि चिमुकल्यांना आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी गावच्या सरपंचांनी केली आहे.

चंद्रपूर काँग्रेस मधील दोन नेत्यामधी वादावर पडला आहे. काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही उदयास आलो आहेत, बहुमता काहीच नगरसेवकांची आवश्यकता आहे अश्या परिस्थितीत पक्षांमध्ये समन्वय आहे. धानोरकरांनी २७ नगरसेवकांचा गट तयार करून विभागीय आयुक्ताकडे दवा केला आहे त्याला वेड्डीतटिवार यांनी विरोध केला आहे. त्यांचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत व त्याचं तो गट तयार झाला आहे व पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. कुठेही दोन वेगळे गट स्थापन होणार नाही याची खात्री आहे एकाच गटात सर्व नगरसेवक राहतील.

सांगलीतील पलूस तालुक्यात ‘आरा फायर क्रंच’ चा नवा जागतिक द्राक्षवाण यशस्वी झाला आहे. द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सांगलीच्या पलूस तालुक्यात आमणापूर येथील बोरजाईनगरच्या माळी कुटुंबाने शेतीत एक नवा इतिहास घडवला आहे. विशाल माळी आणि दामोदर माळी यांच्या एकत्र कुटुंबाने तालुक्यातील ‘आरा फायर क्रंच’ या नवीन जागतिक द्राक्ष वाणाचा पहिलाच यशस्वी प्लॉट फुलवला असून सध्या या बागेची काढणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या बागेकडे वेधले गेले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आजपासून २६ जानेवारी पर्यंत सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. तिकडे माणगाव पुणे मार्गावर देखील पुण्याच्या दिशेकडून माणगाव दिशेकडे येणाऱ्या मार्गिकेवर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज आणि उद्या रद्द झाल्या आहेत. पुणे रेल्वे विभागाच्या दौंड काष्टी स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नोंद इंटरलॉकिंगच्या कामाकरिता दोन दिवसांचा ब्लॉग घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ व २५ जानेवारीला धावणाऱ्या तब्बल २६ एक्सप्रेस तर बारा डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. पुणे सोलापूर व पुणे भुसावळ मार्गावरील सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

आज शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६, महाराष्ट्रातील ठळक घडामोडी. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापुरातील जखमी नगरसेवक मोहन चतुरे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. दोन दिवसांपूर्वी राजकीय वादातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्याच्या साथीदारांनी नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत बंटी म्हसकरला अटक केली. त्याला २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. सध्या जखमी हेमंत चतुरे यांच्यावर बदलापुरातल्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धाराशिव जिल्ह्यात बंडखोरीचा यशवंत सेना पॅटर्न समोर आला आहे. धाराशिव, तुळजापूर व कळंब या ३ तालुक्यात अनेक इच्छुकांनी हा मार्ग स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यशवंत सेने तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर शिवसेना समावेश असून भाजपच्या बंडखोरांनी देखील यशवंत सेनेचा पर्याय निवडला आहे.

पुणे सायकल टूरमध्ये सायकल पट्टूंचा अपघात घडला आहे. दुपारी डेक्कन भागात सायकल पट्टूंचा अपघात झाला. अपघातनंतर सायकल पटूमध्येच वादावादी झाली. काही सायकलपटू आणि पोलिसांनी हा वाद मिटवला आणि पुन्हा स्पर्धा सुरु झाली. दुपारी डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे.

पुण्यात डेटिंग अ‍ॅपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड झाली आहे. डेटिंग अ‍ॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लूटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर मयताच्या पत्नीसह नातेवाईकानी ठिय्या केला. गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. सुसाईड नोटमध्ये जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासन हेतू पुरस्कार या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेत नाही. गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

केसनंदमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पुणे केसनंद पंचायत समिती गटातुन कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातुन भाजपाची मोठी ताकद वाढली आहे. यापूर्वी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती. मात्र कुशाल सातव केसनंद परिसरात भाजपात प्रवेश केल्याने मोठी ताकद वाढली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दोन कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी शिरूर येथे एका गॅरेज चालक शादब रियाज यास दोन कोटी दहा लाख रुपयांचा १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) सह पकडले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्स अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याने घेतले होते अशी प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. मात्र आता या प्रकरणात अनेक धकादायक खुलासे होत असून अहिल्यानगर पोलिसांनी हे एमडी ड्रग्स हे श्रीरामपूर येथे छापा टाकून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *