जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाला धोका बळावताना थोडक्यातच अपघात टाळण्यात यश मिळाले आहे. ही घटना गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर घडली आहे. या विमानात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा प्रवास करत होते.
एअर इंडियाचे विमान AI-1719 दिल्लीहून जयपूरला दुपारी 1:05 वाजता पोहोचले. लँडिंगच्या वेळी विमानाचा पायलट धावपट्टीवर योग्य प्रकारे उतरण्यात अयशस्वी ठरला. विमानाचे नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण झाला होता. तांत्रिक अडचण किंवा धावपट्टीच्या परिस्थितीमुळे ही समस्या निर्माण झाली असावी असे सुरुवातीच्या माहितीनुसार समजते.
पायलटनी हुशारीने लगेचच “गो अराउंड” प्रक्रिया सुरू केली. त्याने विमान पुन्हा हवेत उचलले आणि दहा मिनिटे हवेत फिरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या लँड केले. या कुशल हस्तक्षेपामुळे पंजाबचे माजी नेते सुखजिंदर सिंह रंधवासह सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. सर्वजण सुरक्षित आहेत अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
विमानावतील प्रवाशांनी पायलटच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. एअरपोर्ट सूत्रांनी सांगितले की अशा परिस्थितीत “गो अराउंड” ही मानक सुरक्षा प्रक्रिया आहे. जेव्हा लँडिंग धोकादायक ठरू शकते अशी पायलटाला जाणीव होते, तेव्हा तो पुन्हा उड्डाण करतो आणि दुसऱ्या वेळी उतरण्याचा प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ही दुसरी महत्त्वाची घटना आहे. विमान सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. जयपूर विमानतळावरील धावपट्टीची स्थिती आणि उपकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.