नारायण राणेंना स्टेजवर आली चक्कर: चिपळूणमधील कृषी महोत्सवात भाषण अर्ध्यावर सोडावे लागले

आदित्य कदम
2 Min Read

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना चिपळूण येथे कृषी महोत्सवादरम्यान भाषणाच्या वेळी अचानक चक्कर आल्याची घटना घडली आहे. यामुळे त्यांचे भाषण अर्ध्यावरच थांबावे लागले आणि ते ताबडतोब गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. या घटनेमुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.

चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी आणि कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याच संदर्भात नारायण राणे उद्घाटन समारंभात मुख्यअतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नंदीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राणे दंपतींनी नंदीचे दर्शन घेतले आणि पारंपरिक गीतही गायले. त्यानंतर राणे यांनी दक्षिणा अर्पण केली. बहादुरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात जानेवारी ९ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाली होती.

उद्घाटनानंतर नारायण राणे भाषण करत होते. याच वेळी अचानक त्यांना अस्वस्थता जाणवली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचा आवाज बसला आणि त्यांना चक्कर आल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी आपलं भाषण तात्काळ थांबवून घेतलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासूनही ते टाळाटाळ करत होते आणि ताबडतोब गेस्ट हाऊसकडे निघून गेले.

यापूर्वीच्या दिवशी मात्र राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मोठा शक्तिप्रदर्शन केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी राजकारणातून निवृत्तीचीही टीपा दिली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘मी माझ्या आयुष्यात जी काही पदे मिळवली, ती स्वकर्तृत्वावर मिळवली आहेत. माझं ध्येय होतं, त्या प्रमाणे मी बदत गेलो. मी लोकसभेवर जाण्यापूर्वी देखील मला तिकीट नको असं मी सांगितलं होतं. मात्र तरीही मला तिकीट मिळालं. मात्र आता असं वाटतं की कुठेतरी थांबायला पाहिजे.’ या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या निवृत्तीबाबतच्या चर्चेला या अचानक आलेल्या आरोग्य समस्येने आणखी गती आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *